महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढला; कोकण, मुंबईसह अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा
राज्यात नैऋत्य मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, मुंबई, ठाणे, पालघर आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 24 ते 48 तासांसाठी राज्यातील विविध भागांसाठी ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे.मुंबई आणि उपनगरांमध्ये मंगळवार रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असून अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी आठ तासांत 200 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाने मुंबई आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून ठाणे, रायगड आणि इतर काही भागांतही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून सखल भागांमध्ये पाणी साचणे, वाहतुकीत अडथळे निर्माण होणे आणि काही ठिकाणी स्थानिक पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका हवामान विभागाने वर्तवला आहे. प्रशासनाने नागरिकांना आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
Write your comment
Cancel Reply